नोकरी + मुल +संसार ...… आणि भटकंती !!
“मला माझ्या मनासारखं जगायचं आहे”. असं प्रत्येकाला वाटत. पण नेमक कस? या प्रश्नाचं उत्तर कधी कधी सगळं करून देखील अनुत्तरीतच राहत. आपण एखादी कृती का केली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर शोधली कि सगळं शक्य आहे अस मला वाटत. थोडक्यात काय; आवड असेल तर सवड मिळते. 'मी या जगात आले आहे तर हे जग बघूनच जाईल' असं ठरवलं आहे. म्हणूनच मी खूप फिरते. मला आवडतात हे स्वछंदी प्रवासानुभव! कधी न संपणारे! ते देखील माझ्या कुटुंबासोबत. एक स्त्री म्हणून सगळं म्हणजे घर,संसार,नोकरी आणि मूल सांभाळून फिरणं माझ्यासाठी खूप आव्हात्मक आहे खरं पण शिस्त, कुतूहल आणि आवड यांचे समीकरण नीट जुळून आलं कि जमतंय बघा सगळं.
२०१८ डिसेंबर मध्ये स्वानंदीला घेऊन प्रथमतः मी लोहगड किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगाने तो यशस्वी देखील झाला. या पहिल्या प्रवासाने मला हिम्मत मिळाली. यातूनच नंतर जानेवारीमध्ये रायरेश्वर सर केला आणि २०१९ चे ध्येय मिळालं. ते म्हणजे दर महिन्याला एका तरी किल्याला किंवा एखाद्या महाराष्ट्रातील अभयारण्याला, समुद्र किनाऱ्याला किंवा डोंगराच्या कुशीत लपलेल्या एखाद्या टुमदार रिसॉर्टला भेट द्यायची. त्यानंतर तुंग, तिकोना या सारख्या पुण्याच्या आसपासच्या किल्यांच्या भेटी वाढल्या आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
भटकायचं वेड लहानपणापासूनच कदाचित वडिलांकडून आलेली देणगी. वडिलांमुळे संपूर्ण दक्षिण भारतांतील शहरे रामेश्वर, कन्याकुमारी, तिरुपती, बेंगलोर, चेन्नई, केरळ, हैद्राबाद आणि आणखी कितीतरी शहरे फिरून झाली. आता हा फिरण्याचा वारसा मी पुढे चालवत आहे माझ्या मुली सोबत.
नोकरी, संसार,मूल आणि स्वतःची तब्येत फिरण्यासाठी योग्य व्यवस्थापन लागत हे प्रवासातील अनेक अनुभवाने शिकवलं अर्थात माझे पती आदिनाथ याची पदोपदी मला साथ असतेच. स्वानंदी आयुष्यात येण्या आधी आम्ही दोघे वर्षातून दोन वेळा म्हणजे दर सहा महिन्यांनी अगदी न चुकता संपूर्ण एक ते दीड आठवड्याची सुट्टी घेऊन दांडेली, चिंचणी, औरंगाबाद, हंपी, केरळ, सिमला, चंदिगड, दिल्ली, मनाली, गोवा (अनेकदा), कोकणातील समुद्र किनारे यांसारखी अनेक ठिकाणे पादाक्रांत केली. या सोबत अधून मधून पुण्याच्या आजुबाजुंला फिरायचो ते वेगळच.
बाळ जन्मल्यापासून आम्हा भटक्यांचं ३६० अंशामधलं आयुष्य एकदम ९० अंशाच्या काटकोनासारखं झालं मुल, नोकरी आणि घर बस्स! या तुन बाहेर येण्यासाठी मुलीला घेऊन सर्व प्रथम अक्कलकोटच्या स्वामी समर्थाना लोटांगण घातलं आणि आशीर्वाद घेतला. त्यानंतर स्वानंदी ५ महिन्याची असल्यापासूनच तिला सोबत घेऊन आम्ही फिरायला लागलो. सगळ्यात आधी आमच्या लग्नाच्या सातव्या वाढदिसानिमित्त भोर येथे कॅम्पिंगसाठी नेलं. तिथला आमचा अनुभव आणि तिचा प्रतिसाद खूपच चांगला होता. तिच्या एकंदर प्रवासातील प्रतिसादाने तिला देखील निसर्ग आवडतो हे निश्चित झालं. यातूनच पुढे पुण्याच्या जवळपास आम्ही तिला घेऊन जायला लागलो. ती ज्या दिवशी १ वर्षांची झाली त्याच्या अगदीच दुसऱ्याच दिवशी राजस्थान गाठलं आणि पुण्याची सीमा ओलांडली! नंतर मग पुढे गोवा आणि तळ कोकणही गाठलं.
राजस्थानमध्ये स्वानंदी
|
त्यानंतर आम्हाला असं जाणवलं कि शनिवार- रविवारी एखाद्या ट्रेकला किंवा कुठे फिरायला जायचं झालाच तर एकतर मला नाहीतर आदिनाथला कोणाला तरी बाळा जवळ थांबव लागायचं कारण तिला कडेवर उचलून ४-६ तास घेऊन फिरणं म्हणजे खरंच कठीण होत तिच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील. यावर उपाय शोधण भागच होत. तिच्यासाठी आरामदायी असं बेबी कॅरिअर शोधणं फारच महत्वाचं होत आणि अखेर मला ते सापडलं. एक तोळा सोन्याचा दागिना कि बेबी कॅरिअर हा प्रश्न समोर होता….आणि त्याला मी योग्य न्याय दिला.. भलीमोठी किंमत मोजून शेवटी मी ते विकत घेतलं आणि आमचा प्रश्न सुटला. आता आम्ही खऱ्या अर्थाने स्वछंदी झालो… कुठेही, कधीही फिरणारे ३ इडियट्स झालो!!! बेबी कॅरिअर आल्यावर त्याची चाचणी (trial) घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये जवळचा किल्ला गाठला - तो म्हणजे लोहगड. लोहगडाचा प्रवास माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
![]() |
| लोहगड |
आपण जिथे जन्माला आलो, जिथे आपलं आयुष्य जाणार आहे त्या मातीची, प्रदेशाची ओळख,त्याचा इतिहास यांची ओळख आपल्या भावी पिढीला करून देणं हे एक पालक म्हणून आमचं कर्तव्य आहे असं मला वाटत. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं कि या वर्षी (२०१९) दरमहा एक किल्ला करायचा. स्वानंदीला शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने आत्तापासूनच ओळख करून द्यायची मग भले आपल्याला जरासा त्रास झाला तरी चालेल. कदाचित यातूनच एखादा मावळा महाराष्ट्राला लाभेल. साधारण १५ किलो वजन पाठीला घेऊन किल्ले चढण्यात माझा कस निघतो खरा पण म्हणतात ना - इच्छा तेथे मार्ग ! आणि " प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट" या मुळे आता सगळं सोपं वाटत.
![]() |
| रायरेश्वरची वाट |
आमच्या या २ वर्षांच्या मुलीला सध्या तरी चार-पाच किल्यांची नाव ज्याला आम्ही भेटी दिल्या आहेत ती अगदी नीट सांगता येतात आणि हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत हे देखील ती सांगते. एक पालक म्हणून आम्हाला या पेक्षा अजून मोठा आनंद तो काय! याचा अर्थ प्रत्यक्ष किल्यांवर गेल्यावरच तो गड, किल्ला किंवा एखादं ठिकाण पक्क लक्षात राहत याच हे उत्तम उदाहरण. शेवटी काय- "पेरावे तसे उगवते"!
![]() |
| तुंग |
स्वानंदीसोबत पुढचा प्रवास आणि त्या प्रवासातील संभाव्य अडचणी काय असू शकतील याचा अभ्यास करण्यासाठी आणि माहीती मिळवण्यासाठी आम्ही अनेक पुस्तके वाचायला सुरुवात केली. चेतन बढे या पुस्तकी किड्याने मला उत्तम वाचनीय साहित्य मिळवून देण्यास खूप मदत केली. या साहित्यामुळे संपूर्ण वर्षभराचं नियोजन आखण्यास भरपूर मदत झाली. एखाद्या किल्याला जायचं असेल किल्यावरील वातावरण, पाण्याची सोय, तिथला परिसर,पोटापाण्याची सोय, उपलब्ध वाहतुकीची साधने आणि जवळपास राहण्याची ठिकाणे या सारख्या मूलभूत गोष्टी आणि गरजांचा अभ्यास करता येतो. सोबत लहान मूल असेल तर अगदी कटाक्षाने याचा विचार कारालाच पाहिजे कि जेणे करून प्रवास सुखकारक होईल, बाळाला देखील त्रास होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येपण ही वेळेवर रुजू होता येईल.
सह्याद्रीच्या कुशीत भटकायचे म्हणजे साधी गोष्ट नाही. गिरिभ्रमण हे साहसी क्रीडाप्रकारात मोडणारे प्रकरण आहे हे लक्ष्यात आले. दऱ्या-खोऱ्यातून भटकायचे म्हंजे जोखिम. येणाऱ्या काळात सुरु राहणारी भटकंती सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी एक मोठं पाऊल टाकायचं असं ठरवलं. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या गाठी भेटी घेणं सुरु झालं. या दरम्यान आमची मा. सुरेंद्र शेळके सर यांच्याशी ओळख झाली. सरांनी गिरिभ्रमण करताना येणाऱ्या असंख्य अडथळ्यांची ओळख करून दिली. या अडथळ्यांवर मात करायची असेल तर या क्षेत्राचं शास्त्रीय ज्ञान अवगत असणं फार मोलाचं ठरतं. म्हणूनच त्यांनी "Basic Mountaineering Course" करण्याचा लाखमोलाचा सल्ला दिला. मी लगेचच तयारीला लागले. सरांनी माहिती पुरवलेल्या "Indian Himalayan Center for Adventure & Eco Tourism (IHCAE)" या नामांकित संस्थेत प्रवेश घेऊन सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये २८ दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. या प्रशिक्षणादरम्यान पर्वतारोहण, प्रस्तरारोहण (रॉक क्लाइंबिंग) आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन जिवंत राहणे या कौशल्याची मूलभूत तंत्रे शिकवण्यात आली. पर्वतारोहण आणि त्यासंबंधित संबंधित विषयांचे नकाशा वाचन, हवामान अंदाज, प्रथमोपचार प्रशिक्षण आणि चढाईचे धोके यासारख्या विविध बाबी शिकवल्या गेल्या. वास्तविक स्वरूपात पर्वतारोहण करणे सोपे काम नाही. आरोग्याचा प्रश्न, विशेषत: उच्च उंचींमध्ये त्याचा वाटा आहे. त्यांना हाताळणे, अनिश्चित अडचणी टाळणे आणि चढाई यशस्वीरित्या पूर्ण करणे हि उद्दीष्टे साध्य करत हिमालयातील तेनझिंग खांग या शिखरावर १८६५० पर्यंत उंची गाठली.
आमच्या कौटुंबिक भटकंतीला १ वर्ष पूर्ण होईल. या १ वर्षाच्या कालावधीत सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांनी, दऱ्या-खोऱ्यांनी आम्हाला साद घातली. सह्याद्रीची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच्या कुशीत वसलेल्या काही निवडक ठिकाणांना भेट देत आम्हीही प्रतिसाद दिला. आता हा प्रवास अर्थात भटकंती निरंतर चालू राहील हे मात्र नक्की.
आम्ही स्वानंदीसोबत भेट दिलेल्या निवडक ठिकाणांची यादी:
१. किल्ले लोहगड
२. किल्ले रायरेश्वर
३. किल्ले तिकोना
४. किल्ले तुंग
५. किल्ले राजमाची
६. किल्ले मल्हारगड
७. किल्ले पुरंदर
८. किल्ले पन्हाळगड
९. किल्ले गोपाळगड
१०. देवकुंड धबधबा
आमचा प्रवास आणि प्रवासातील बरे वाईट अनुभव मी माझ्या डायरीत लिहीत असे आणि लिहून झाल्यावर ती डायरी उशीखाली पडून राहायची.आदिनाथने जेव्हा माझं लिखाण वाचलं तेव्हा हे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून जगासोबत शेअर करण्यासाठी त्याने मला उस्फुर्त केलं आणि यातूनच - स्वच्छंदी! न संपणारे प्रवासानुभव!! या माझ्या मराठी ब्लॉगची सुरुवात झाली.https://swacchandie.blogspot.com/ २०१५ पासून मी हा ब्लॉग लिहित आहे आणि माझ्या बंद डायरीतील प्रवासानुभव अनेक वाचकांपर्यंत पोहचवत आहे.
आमच्या कौटुंबिक भटकंतीला १ वर्ष पूर्ण होईल. या १ वर्षाच्या कालावधीत सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांनी, दऱ्या-खोऱ्यांनी आम्हाला साद घातली. सह्याद्रीची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच्या कुशीत वसलेल्या काही निवडक ठिकाणांना भेट देत आम्हीही प्रतिसाद दिला. आता हा प्रवास अर्थात भटकंती निरंतर चालू राहील हे मात्र नक्की.
आम्ही स्वानंदीसोबत भेट दिलेल्या निवडक ठिकाणांची यादी:
१. किल्ले लोहगड
२. किल्ले रायरेश्वर
३. किल्ले तिकोना
४. किल्ले तुंग
५. किल्ले राजमाची
६. किल्ले मल्हारगड
७. किल्ले पुरंदर
८. किल्ले पन्हाळगड
९. किल्ले गोपाळगड
१०. देवकुंड धबधबा
![]() |
आमचा प्रवास आणि प्रवासातील बरे वाईट अनुभव मी माझ्या डायरीत लिहीत असे आणि लिहून झाल्यावर ती डायरी उशीखाली पडून राहायची.आदिनाथने जेव्हा माझं लिखाण वाचलं तेव्हा हे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून जगासोबत शेअर करण्यासाठी त्याने मला उस्फुर्त केलं आणि यातूनच - स्वच्छंदी! न संपणारे प्रवासानुभव!! या माझ्या मराठी ब्लॉगची सुरुवात झाली.https://swacchandie.blogspot.com/ २०१५ पासून मी हा ब्लॉग लिहित आहे आणि माझ्या बंद डायरीतील प्रवासानुभव अनेक वाचकांपर्यंत पोहचवत आहे.
माझे लिखाण आणि त्यातील माहिती ही जास्त करून पालकांसाठी असते कि जेणे करून लहान मुलांसोबत गड-किल्ले चढण शक्य आहे हे त्यांना पटेल आणि सोईस्करदेखील वाटेल. मला सांगायला अत्यंत आनंद होतो कि माझ्या अनेक शाळेतील मित्र मैत्रीणीनी, ओळखीतल्या लोकांनी माझे लेख वाचून मुलांसोबत किल्याना भेटी द्यायला चालू केलं आहे. अनेक माझ्या मैत्रिणींना मी एक प्रेरणा देणारा स्रोत वाटत आहे कि नोकरी,घर-दार,मुलं हे सगळं सांभाळून मी किल्ले चढत आहेत. माझ्या ब्लॉग्स मुळे अनेक लहान -थोरांचे आशीर्वाद आणि शुभेच्यांचा वर्षाव देखील माझ्यावर होत आहे. याच शुभेच्या आणि आशीर्वाद मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. या प्रवासात माझे पती आदिनाथ,माझी बहीण मोनिका आणि माझा मित्र चेतन यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे. त्याच सोबत माझे अनेक वाचक आणि शुभचिंतक देखील!
तर वाचकांनो आणि खास करून मातांनो -किल्ले फिरा आणि भावी पिढीला महाराष्ट्र दाखवा.

















Comments
Post a Comment